रेबीजने बाधित कुत्रा, मांजर, माकड आदी रेबीज
पसरविण्यास कारणीभूत ठरतात. 28 सप्टेंबर हा दिवस "जागतिक रेबीज दिन' म्हणून
साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने रेबीज नियंत्रणाबाबत जागरूक होऊ या.
रेबीज हा ऱ्हायाबडोव्हायरस या कुटुंबातील विषाणू आहे. जंतुनाशकाला हा विषाणू अत्यंत संवेदनक्षम असून, वातावरणात तसेच शरीराबाहेर हा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. रेबीज हा रोग प्रामुख्याने रेबीजग्रस्त प्राण्याच्या चाव्यामुळे होतो. काही वेळा कातडीवरील जखमांना रोगी जनावराची लाळ लागल्यानेदेखील होतो. रेबीज रोगाने बाधित मृत जनावराचे मांस वटवाघुळ व इतर प्राणी खाल्ल्यामुळे त्यांना या रोगाची लागण होऊ शकते. रेबीजने बाधित कुत्रा, मांजर, माकड आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. या शिवाय लांडगा, कोल्हा, वटवाघुळ व मुंगूससुद्धा रेबीज रोग पसरवतात.
...असा होतो रेबीजचा प्रसार
1) पिसाळलेला कुत्रा माणसाला किंवा प्राण्याला चावला तर लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्या नंतर मज्जातंतूंद्वारे मध्यवर्ती मज्जासंस्थेत प्रवेश करतात. या ठिकाणी वाढ होण्यासाठी त्याला साधारण दोन ते तीन महिने लागतात. या कालावधीत अधिशयन काळ असे म्हणतात. या कालावधित रोगी कुठलीच लक्षणे दाखवत नाहीत.
2) एकदा लक्षणे दिसायला लागली, की मृत्यू अटळ समजावा. अधिशयन काळात हा विषाणू वेगाने वाढतो, मेंदूत पसरतो रोगाच्या सुरवातीच्या काळात म्हणजे "प्रोड्रॉमल' अवस्थेत काही लक्षणे दिसतात. मज्जातंतूंद्वारे विषाणू पृष्ठमज्जारज्जू व मेंदू या केंद्रीय मज्जा संस्थेच्या प्रमुख इंद्रियांपर्यंत पोचतात. केंद्रस्थानी पोचल्यानंतर हे विषाणू तेथील पेशींचा दाह निर्माण करून पेशींचा नाश करतात, त्यामुळे मज्जारज्जूंमुळे प्रभावित होणारी कार्यक्षमता बिघडते व त्या भागात बधिरपणा जाणवू लागतो.
3) घशाच्या स्नायूंचा बधिरपणा व पक्षाघातामुळे लाळ व पाणी गिळता येत नाही. यामुळे रेबीजग्रस्त माणूस किंवा प्राणी सतत लाळ गाळतात.
4) रेबीजचे विषाणू रक्ताद्वारे मेंदूतून रक्तावाटे शरीरातील इतर महत्त्वाचे अवयव उदा. यकृत, मूत्रपिंड, हृदय, स्वादूपिंड, फुफ्फुसे यात पोचतात. लाळेद्वारे जखमेत शिरतात. मज्जा संस्थेच्या पेशीचा नाश झाल्यामुळे होणाऱ्या बधिरपणा बरोबरच श्वास घेण्याच्या स्नायूची क्रियादेखील बंद होते, मृत्यू ओढवतो.
रोगजंतू प्रवेशानंतर रोग किती दिवसात होतो?
1) रोगजंतूंचा शरीरात प्रसार चावा घेतलेली (विषाणू बाधित) जागा व मेंदूतील अंतर यावर अवलंबून आहे.
2) मेंदू व बाधित जागेतील अंतर जेवढे कमी तेवढे रोगाची लक्षणे लवकर दिसतात. तोंडाजवळ चावलेल्या जखमेपेक्षा पायावर चावलेल्या जखमेतून मेंदूचे अंतर जास्त असल्याने हा काळ बराच जास्त म्हणजे काही आठवडे किंवा काही महिने ते वर्ष इतका मोठा असू शकतो. याशिवाय चावा घेतलेली जखम मोठी असेल आणि त्यात विषाणूंची संख्या अधिक असेल, तर रोगाची लक्षणे अधिक लवकर दिसतात.
3) कुत्र्याने किती ठिकाणी चावा घेतला यावरही रोगाची लक्षणे लवकर किंवा उशिरा दिसणे अवलंबून असते.
4) एका ठिकाणी चावा घेतल्यापेक्षा दोन-तीन ठिकाणी चावा घेतलेल्या जनावरात, माणसात रोगाची लक्षणे लवकर व अधिक तीव्रतेने दिसू शकतात.
रेबीजची लक्षणे ः रेबीजग्रस्त कुत्रा/ मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे 20 ते 30 दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात; परंतु काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात. कुत्रा चावल्यानंतर निदान 15 दिवस तो सुदृढ राहिल्यानंतर रेबीजमुक्त आहे, असे समजायला हरकत नाही.
जनावरात आढळणारे रेबीजचे प्रकार ः
1) चवताळलेला प्रकार 2) मुका प्रकार
कुत्र्यात व गाई म्हशींत वरील दोन्ही प्रकार दिसून येतात. तर मांजर, कोल्हा, लांडगे या प्राण्यांत चवताळलेला प्रकार अधिक असतो. आपल्या देशात मुख्यत्वेकरून चवताळलेला रेबीजचा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो.
मुका प्रकार ः
1) या प्रकारात कुत्र्याच्या हालचाली कमी होऊन ते सुस्त व आळशी बनतात. माणसापासून दूर राहतात. घराच्या कुठेतरी कोपऱ्यात किंवा फर्निचर खाली अंधाऱ्या जागेवर जाऊन बसतात, अशा कुत्र्यांना ओरडता येत नाही.
2) कुत्र्यांचा खालचा जबडा लुळा पडतो व लाळ गळते. थरथर कापतात, त्यांना लुळेपणा येतो. जमिनीवर पडून राहतात.
3) शांत अवस्थेत तीन दिवसांत मरतात.
4) तीव्र प्रकारात जनावरे अतिशय उग्र होतात. माणसाच्या अंगावर धावून येतात, शिंगे व डोके झाडावर किंवा भिंतीवर आदळतात.
5) डोळे लाल होतात, तोंडाला फेस येतो, चारा खाणे व रवंथ करणे बंद होते, बैल वारंवार थोडी थोडी लघवी करतात.
6) जनावरे घोगऱ्या आवाजात ओरडतात. कमी तीव्र, प्रकारात जनावराच्या कातडीला स्पर्श केला तरी त्याची जाणीव होत नाही.
चवताळलेला प्रकार ः
1) या प्रकारात कुत्रे निरनिराळी लक्षणे दाखवतात. कुत्र्याचे खाण्यापिण्यावर लक्ष राहात नाही. रोजच्या सवयीत बदल होतो, कुत्रा मालकाचे आदेश पाळत नाही. एकाकी शांत राहतो, लाळ गाळतो. यापुढील अवस्थेत कुत्रा संबंधित माणसापासून दूर राहतो.
2) कुत्रा अतिशय उत्तेजित होतो. मोकळा सोडल्यास भटकंती मार्गात येणाऱ्या सजीव वा निर्जीव वस्तूंना चावा घेतो. विनाकारण भुंकतो, घोगरा आवाज येतो.
3) अखाद्य वस्तू उदा. लाकडाचा तुकडा, दगड इत्यादी चघळतो किंवा गिळून टाकतो. खूप दूरवर पळत जातो. बऱ्याच वेळा घरी परत येत नाही.
4) थोड्या थोड्या वेळाने लघवी करतो. लाळ गाळण्याचे प्रमाण वाढते, डोळे लालभडक होतात. पक्षाघात किंवा पंगू होण्याची अवस्था चार ते सात दिवसांपर्यंत राहते.
5) कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज घोगरा होतो किंवा आवाज बंद होतो, तोंडाच्या खालचा जबडा लुळा पडतो व जीभ बाहेर येते. मान खाली किंवा वाकडी होते. शेपटी सरळ दिसते कुत्रा अडखळत झोकांड्या खात चालतो, नंतर चक्कर येऊन पडतो. मागचे पाय लुळे पडल्याने उभा राहू शकत नाही. शेवटी श्वासोच्छ्वास बंद पडल्याने मृत्यू होतो.
माणसातील लक्षणे ः 1) माणसात पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर साधारणपणे 10 ते 90 दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात. तीव्र डोकेदुखी, ओकारी आल्यासारखी वाटते.
2) नाका-डोळ्यांतून पाणी वाहणे/ गळणे, घशाला कोरड येणे, जेवण न करणे व पाणी पिणे बंद होणे. पाण्याची भीती वाटायला लागते. चेहऱ्यावरचे स्नायू निष्प्राण होतात.
3) जसजसा हा विषाणू मेंदूचा ताबा घेतो, तसतसे क्लेशदायक झटके येतात. घेतलेले द्रव्य पदार्थ तसेच तोंडावाटे बाहेर पडतात. अखेरीस रोगी बेशुद्ध होतो आणि 7 ते 10 दिवसांत मृत्यू पावतो.
प्रथमोपचार ः 1) कुत्रा चावल्यानंतर करावयाच्या प्रथमोपचाराचा मुख्य उद्देश रेबीज रोगापासून प्रतिबंध करणे हाच असतो. रेबीजग्रस्त किंवा मज्जासंस्थेशी निगडित लक्षणे दाखवतात.
2) कुत्रा किंवा मांजर चावल्यास त्वरित ती जखम धावत्या पाण्याखाली पकडून धुऊन टाकावी. त्यानंतर जंतुनाशक मलम लावावे. जखम स्वच्छ केल्यावर हात स्वच्छ धुवावेत. जखमेतून रक्त जर जास्त प्रमाणात वाहत असेल तरच त्यावर पट्टी बांधावी.
3) जखमेवर हळद, चुना किंवा इतर कुठलेही पदार्थ लावू नयेत. जखमेवर टाके देऊ नयेत.
4) चावलेला कुत्रा जर माहितीचा असेल, तर त्याला रेबीज प्रतिबंधक लसीकरण झालेले आहे की नाही, याची सविस्तर माहिती घ्यावी. अशा कुत्र्यांवर 10 ते 15 दिवस बारकाईने लक्ष द्यावे.
5) रेबीज रोगप्रतिबंधक लस दिलेल्या कुत्र्यास जर पिसाळलेला कुत्रा चावला, तर लसीची किमान अर्धी मात्रा तरी देऊन घ्यावी. पूर्ण मात्रा देणे उत्तम. कारण क्वचित प्रसंगी लसीकरण करतेवेळी कुत्रा आजारी/ अशक्त असेल, लस योग्य त्या तापमानास साठवलेली नसेल, योग्य त्या मात्रेत लस न टोचली गेल्यास किंवा लसीची कालमर्यादा संपल्यानंतर जर दिली असेल, तर त्या कुत्र्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही.
6) आपल्या कुत्र्यास रोगप्रतिबंधक लस न दिलेला, परंतु सर्वसामान्य दिसणारा एखादा कुत्रा चावला, तरी सुद्धा लसीकरण करणे उचित असते, कारण वरवर सर्वसामान्य दिसणाऱ्या एखाद्या कुत्र्याच्या लाळेतही रेबीजचे जंतू असू शकतात.
7) वैद्यकशास्त्रातील प्रयत्नाने आता रेबीज नियंत्रणासाठी उच्च दर्जाच्या लसीची निर्मिती केली आहे. या लसी महाग आहेत. पण अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असतात. याची फक्त पाच इंजेक्शने (0, 3, 5, 14, 28 व्या दिवशी) दंडात घ्यावी लागतात. कुत्रा जर 15 दिवसांनंतर जिवंत राहिला नाही, तर उरलेली दोन इंजेक्शन (60 आणि 90 व्या दिवशी) घेणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक उपाय ः 1) ग्रामपंचायत व नगर परिषदेमार्फत मोकाट/ बेवारशी कुत्र्याचा बंदोबस्त करावा. ग्राम पंचायत व नगरपरिषदेमार्फत पाळीव कुत्र्याचे नोंदणीकरण करावे.
2) पिसाळलेल्या कुत्र्यांचा नायनाट करावा. त्याचे मृत शरीर जमिनीत खोल गाडून टाकावे.
3) या रोगाचा प्रसार विशेषतः मोकाट कुत्र्यामुळे होतो. त्यामुळे आपले पाळीव कुत्रे त्यांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
4) पाळीव कुत्रा व मांजर यास रेबीज प्रतिबंधक लसीकरण नियमितपणे करून घ्यावे. ही लस सुरवातीला तीन महिने वयाच्या पिल्लास द्यावी व तद्नंतर दरवर्षी एक वेळ या प्रमाणे देऊन घ्यावी. लसीकरण करतेवेळी कुत्रा आजारी नसावा व तत्पूर्वी त्याला जंतनिवारक औषध द्यावे. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे विकसित होते. तसेच योग्य त्या तापमानास साठवण केलेली, मुदत न संपलेली लस योग्य त्या मात्रेत द्यावयाची खबरदारी घ्यावी.
5) दुधाद्वारे रेबीज पसरण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, पण दूध नेहमी उकळूनच वापरावे.
6) पिसाळलेला कुत्रा चावलेली गाय, म्हैस, शेळी, मेंढी याचे दूध हाताळते वेळी विशेष काळजी घ्यावी. अन्यथा हातावरील बारीक ओरखडे किंवा जखमांद्वारे रेबीज संक्रमण संभवते. दुधात असलेले विषाणू पोटात गेल्यास दूध पिणाऱ्यास रेबीज रोग झाल्याचे उदा. उपलब्ध नाही. परंतु अशा गाई, म्हशी, शेळी, मेंढीचे दूध उकळून वापरल्याने बाधा होत नाही.
7) रेबीज होऊच न देणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
8) कुत्र्या, मांजराने बारीकसा चावा जरी घेतला किंवा त्यांचा दात लागला आणि रक्त आले तर त्वरित डॉक्टरांना भेटावे.
9) याव्यतिरिक्त ससा, खार, मांजर, वटवाघूळ, उंदीर यांच्यापासून देखील रेबीजची लागण होऊ शकते. या प्राण्यांनी जर तुम्हाला चावा घेतला किंवा नखांची ओरखडले, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. गजानन ढगे ः 9423139923
डॉ. अनिल भिकाने ः 9423139923
(डॉ. ढगे हे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ,(पशुवैद्यक शास्त्र); तर डॉ. भिकाने हे पशू वैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत.)
रेबीज हा ऱ्हायाबडोव्हायरस या कुटुंबातील विषाणू आहे. जंतुनाशकाला हा विषाणू अत्यंत संवेदनक्षम असून, वातावरणात तसेच शरीराबाहेर हा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. रेबीज हा रोग प्रामुख्याने रेबीजग्रस्त प्राण्याच्या चाव्यामुळे होतो. काही वेळा कातडीवरील जखमांना रोगी जनावराची लाळ लागल्यानेदेखील होतो. रेबीज रोगाने बाधित मृत जनावराचे मांस वटवाघुळ व इतर प्राणी खाल्ल्यामुळे त्यांना या रोगाची लागण होऊ शकते. रेबीजने बाधित कुत्रा, मांजर, माकड आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. या शिवाय लांडगा, कोल्हा, वटवाघुळ व मुंगूससुद्धा रेबीज रोग पसरवतात.
...असा होतो रेबीजचा प्रसार
1) पिसाळलेला कुत्रा माणसाला किंवा प्राण्याला चावला तर लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्या नंतर मज्जातंतूंद्वारे मध्यवर्ती मज्जासंस्थेत प्रवेश करतात. या ठिकाणी वाढ होण्यासाठी त्याला साधारण दोन ते तीन महिने लागतात. या कालावधीत अधिशयन काळ असे म्हणतात. या कालावधित रोगी कुठलीच लक्षणे दाखवत नाहीत.
2) एकदा लक्षणे दिसायला लागली, की मृत्यू अटळ समजावा. अधिशयन काळात हा विषाणू वेगाने वाढतो, मेंदूत पसरतो रोगाच्या सुरवातीच्या काळात म्हणजे "प्रोड्रॉमल' अवस्थेत काही लक्षणे दिसतात. मज्जातंतूंद्वारे विषाणू पृष्ठमज्जारज्जू व मेंदू या केंद्रीय मज्जा संस्थेच्या प्रमुख इंद्रियांपर्यंत पोचतात. केंद्रस्थानी पोचल्यानंतर हे विषाणू तेथील पेशींचा दाह निर्माण करून पेशींचा नाश करतात, त्यामुळे मज्जारज्जूंमुळे प्रभावित होणारी कार्यक्षमता बिघडते व त्या भागात बधिरपणा जाणवू लागतो.
3) घशाच्या स्नायूंचा बधिरपणा व पक्षाघातामुळे लाळ व पाणी गिळता येत नाही. यामुळे रेबीजग्रस्त माणूस किंवा प्राणी सतत लाळ गाळतात.
4) रेबीजचे विषाणू रक्ताद्वारे मेंदूतून रक्तावाटे शरीरातील इतर महत्त्वाचे अवयव उदा. यकृत, मूत्रपिंड, हृदय, स्वादूपिंड, फुफ्फुसे यात पोचतात. लाळेद्वारे जखमेत शिरतात. मज्जा संस्थेच्या पेशीचा नाश झाल्यामुळे होणाऱ्या बधिरपणा बरोबरच श्वास घेण्याच्या स्नायूची क्रियादेखील बंद होते, मृत्यू ओढवतो.
रोगजंतू प्रवेशानंतर रोग किती दिवसात होतो?
1) रोगजंतूंचा शरीरात प्रसार चावा घेतलेली (विषाणू बाधित) जागा व मेंदूतील अंतर यावर अवलंबून आहे.
2) मेंदू व बाधित जागेतील अंतर जेवढे कमी तेवढे रोगाची लक्षणे लवकर दिसतात. तोंडाजवळ चावलेल्या जखमेपेक्षा पायावर चावलेल्या जखमेतून मेंदूचे अंतर जास्त असल्याने हा काळ बराच जास्त म्हणजे काही आठवडे किंवा काही महिने ते वर्ष इतका मोठा असू शकतो. याशिवाय चावा घेतलेली जखम मोठी असेल आणि त्यात विषाणूंची संख्या अधिक असेल, तर रोगाची लक्षणे अधिक लवकर दिसतात.
3) कुत्र्याने किती ठिकाणी चावा घेतला यावरही रोगाची लक्षणे लवकर किंवा उशिरा दिसणे अवलंबून असते.
4) एका ठिकाणी चावा घेतल्यापेक्षा दोन-तीन ठिकाणी चावा घेतलेल्या जनावरात, माणसात रोगाची लक्षणे लवकर व अधिक तीव्रतेने दिसू शकतात.
रेबीजची लक्षणे ः रेबीजग्रस्त कुत्रा/ मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे 20 ते 30 दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात; परंतु काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात. कुत्रा चावल्यानंतर निदान 15 दिवस तो सुदृढ राहिल्यानंतर रेबीजमुक्त आहे, असे समजायला हरकत नाही.
जनावरात आढळणारे रेबीजचे प्रकार ः
1) चवताळलेला प्रकार 2) मुका प्रकार
कुत्र्यात व गाई म्हशींत वरील दोन्ही प्रकार दिसून येतात. तर मांजर, कोल्हा, लांडगे या प्राण्यांत चवताळलेला प्रकार अधिक असतो. आपल्या देशात मुख्यत्वेकरून चवताळलेला रेबीजचा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो.
मुका प्रकार ः
1) या प्रकारात कुत्र्याच्या हालचाली कमी होऊन ते सुस्त व आळशी बनतात. माणसापासून दूर राहतात. घराच्या कुठेतरी कोपऱ्यात किंवा फर्निचर खाली अंधाऱ्या जागेवर जाऊन बसतात, अशा कुत्र्यांना ओरडता येत नाही.
2) कुत्र्यांचा खालचा जबडा लुळा पडतो व लाळ गळते. थरथर कापतात, त्यांना लुळेपणा येतो. जमिनीवर पडून राहतात.
3) शांत अवस्थेत तीन दिवसांत मरतात.
4) तीव्र प्रकारात जनावरे अतिशय उग्र होतात. माणसाच्या अंगावर धावून येतात, शिंगे व डोके झाडावर किंवा भिंतीवर आदळतात.
5) डोळे लाल होतात, तोंडाला फेस येतो, चारा खाणे व रवंथ करणे बंद होते, बैल वारंवार थोडी थोडी लघवी करतात.
6) जनावरे घोगऱ्या आवाजात ओरडतात. कमी तीव्र, प्रकारात जनावराच्या कातडीला स्पर्श केला तरी त्याची जाणीव होत नाही.
चवताळलेला प्रकार ः
1) या प्रकारात कुत्रे निरनिराळी लक्षणे दाखवतात. कुत्र्याचे खाण्यापिण्यावर लक्ष राहात नाही. रोजच्या सवयीत बदल होतो, कुत्रा मालकाचे आदेश पाळत नाही. एकाकी शांत राहतो, लाळ गाळतो. यापुढील अवस्थेत कुत्रा संबंधित माणसापासून दूर राहतो.
2) कुत्रा अतिशय उत्तेजित होतो. मोकळा सोडल्यास भटकंती मार्गात येणाऱ्या सजीव वा निर्जीव वस्तूंना चावा घेतो. विनाकारण भुंकतो, घोगरा आवाज येतो.
3) अखाद्य वस्तू उदा. लाकडाचा तुकडा, दगड इत्यादी चघळतो किंवा गिळून टाकतो. खूप दूरवर पळत जातो. बऱ्याच वेळा घरी परत येत नाही.
4) थोड्या थोड्या वेळाने लघवी करतो. लाळ गाळण्याचे प्रमाण वाढते, डोळे लालभडक होतात. पक्षाघात किंवा पंगू होण्याची अवस्था चार ते सात दिवसांपर्यंत राहते.
5) कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज घोगरा होतो किंवा आवाज बंद होतो, तोंडाच्या खालचा जबडा लुळा पडतो व जीभ बाहेर येते. मान खाली किंवा वाकडी होते. शेपटी सरळ दिसते कुत्रा अडखळत झोकांड्या खात चालतो, नंतर चक्कर येऊन पडतो. मागचे पाय लुळे पडल्याने उभा राहू शकत नाही. शेवटी श्वासोच्छ्वास बंद पडल्याने मृत्यू होतो.
माणसातील लक्षणे ः 1) माणसात पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर साधारणपणे 10 ते 90 दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात. तीव्र डोकेदुखी, ओकारी आल्यासारखी वाटते.
2) नाका-डोळ्यांतून पाणी वाहणे/ गळणे, घशाला कोरड येणे, जेवण न करणे व पाणी पिणे बंद होणे. पाण्याची भीती वाटायला लागते. चेहऱ्यावरचे स्नायू निष्प्राण होतात.
3) जसजसा हा विषाणू मेंदूचा ताबा घेतो, तसतसे क्लेशदायक झटके येतात. घेतलेले द्रव्य पदार्थ तसेच तोंडावाटे बाहेर पडतात. अखेरीस रोगी बेशुद्ध होतो आणि 7 ते 10 दिवसांत मृत्यू पावतो.
प्रथमोपचार ः 1) कुत्रा चावल्यानंतर करावयाच्या प्रथमोपचाराचा मुख्य उद्देश रेबीज रोगापासून प्रतिबंध करणे हाच असतो. रेबीजग्रस्त किंवा मज्जासंस्थेशी निगडित लक्षणे दाखवतात.
2) कुत्रा किंवा मांजर चावल्यास त्वरित ती जखम धावत्या पाण्याखाली पकडून धुऊन टाकावी. त्यानंतर जंतुनाशक मलम लावावे. जखम स्वच्छ केल्यावर हात स्वच्छ धुवावेत. जखमेतून रक्त जर जास्त प्रमाणात वाहत असेल तरच त्यावर पट्टी बांधावी.
3) जखमेवर हळद, चुना किंवा इतर कुठलेही पदार्थ लावू नयेत. जखमेवर टाके देऊ नयेत.
4) चावलेला कुत्रा जर माहितीचा असेल, तर त्याला रेबीज प्रतिबंधक लसीकरण झालेले आहे की नाही, याची सविस्तर माहिती घ्यावी. अशा कुत्र्यांवर 10 ते 15 दिवस बारकाईने लक्ष द्यावे.
5) रेबीज रोगप्रतिबंधक लस दिलेल्या कुत्र्यास जर पिसाळलेला कुत्रा चावला, तर लसीची किमान अर्धी मात्रा तरी देऊन घ्यावी. पूर्ण मात्रा देणे उत्तम. कारण क्वचित प्रसंगी लसीकरण करतेवेळी कुत्रा आजारी/ अशक्त असेल, लस योग्य त्या तापमानास साठवलेली नसेल, योग्य त्या मात्रेत लस न टोचली गेल्यास किंवा लसीची कालमर्यादा संपल्यानंतर जर दिली असेल, तर त्या कुत्र्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही.
6) आपल्या कुत्र्यास रोगप्रतिबंधक लस न दिलेला, परंतु सर्वसामान्य दिसणारा एखादा कुत्रा चावला, तरी सुद्धा लसीकरण करणे उचित असते, कारण वरवर सर्वसामान्य दिसणाऱ्या एखाद्या कुत्र्याच्या लाळेतही रेबीजचे जंतू असू शकतात.
7) वैद्यकशास्त्रातील प्रयत्नाने आता रेबीज नियंत्रणासाठी उच्च दर्जाच्या लसीची निर्मिती केली आहे. या लसी महाग आहेत. पण अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असतात. याची फक्त पाच इंजेक्शने (0, 3, 5, 14, 28 व्या दिवशी) दंडात घ्यावी लागतात. कुत्रा जर 15 दिवसांनंतर जिवंत राहिला नाही, तर उरलेली दोन इंजेक्शन (60 आणि 90 व्या दिवशी) घेणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक उपाय ः 1) ग्रामपंचायत व नगर परिषदेमार्फत मोकाट/ बेवारशी कुत्र्याचा बंदोबस्त करावा. ग्राम पंचायत व नगरपरिषदेमार्फत पाळीव कुत्र्याचे नोंदणीकरण करावे.
2) पिसाळलेल्या कुत्र्यांचा नायनाट करावा. त्याचे मृत शरीर जमिनीत खोल गाडून टाकावे.
3) या रोगाचा प्रसार विशेषतः मोकाट कुत्र्यामुळे होतो. त्यामुळे आपले पाळीव कुत्रे त्यांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
4) पाळीव कुत्रा व मांजर यास रेबीज प्रतिबंधक लसीकरण नियमितपणे करून घ्यावे. ही लस सुरवातीला तीन महिने वयाच्या पिल्लास द्यावी व तद्नंतर दरवर्षी एक वेळ या प्रमाणे देऊन घ्यावी. लसीकरण करतेवेळी कुत्रा आजारी नसावा व तत्पूर्वी त्याला जंतनिवारक औषध द्यावे. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे विकसित होते. तसेच योग्य त्या तापमानास साठवण केलेली, मुदत न संपलेली लस योग्य त्या मात्रेत द्यावयाची खबरदारी घ्यावी.
5) दुधाद्वारे रेबीज पसरण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, पण दूध नेहमी उकळूनच वापरावे.
6) पिसाळलेला कुत्रा चावलेली गाय, म्हैस, शेळी, मेंढी याचे दूध हाताळते वेळी विशेष काळजी घ्यावी. अन्यथा हातावरील बारीक ओरखडे किंवा जखमांद्वारे रेबीज संक्रमण संभवते. दुधात असलेले विषाणू पोटात गेल्यास दूध पिणाऱ्यास रेबीज रोग झाल्याचे उदा. उपलब्ध नाही. परंतु अशा गाई, म्हशी, शेळी, मेंढीचे दूध उकळून वापरल्याने बाधा होत नाही.
7) रेबीज होऊच न देणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
8) कुत्र्या, मांजराने बारीकसा चावा जरी घेतला किंवा त्यांचा दात लागला आणि रक्त आले तर त्वरित डॉक्टरांना भेटावे.
9) याव्यतिरिक्त ससा, खार, मांजर, वटवाघूळ, उंदीर यांच्यापासून देखील रेबीजची लागण होऊ शकते. या प्राण्यांनी जर तुम्हाला चावा घेतला किंवा नखांची ओरखडले, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. गजानन ढगे ः 9423139923
डॉ. अनिल भिकाने ः 9423139923
(डॉ. ढगे हे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ,(पशुवैद्यक शास्त्र); तर डॉ. भिकाने हे पशू वैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत.)
No comments:
Post a Comment